औरंगाबाद : बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचं चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे तर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पैठण येथील बाजार समितीत कांद्याला अवघे १ रुपय किलोचा भाव मिळाला.

मागील वर्षाचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे आणि त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही, पण बाजारात मिळत असलेला भाव पाहता शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे.

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून, शरीराचे १७ तुकडे केले अन्…; दोन महिन्यांनी धक्कादायक खुलासा
अतिवृष्टी आणि आवकाळीच्या असमानी संकटातून बाहेर पडत नाही तो बळीराजा पुन्हा एकदा महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटात सापडला आहे. त्यातच आता हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत असल्याने लावलेलं खर्चही निघणं अवघड झाले आहे.

मराठवाड्यात घोटभर पाण्यासाठी वनवन, ऐन उन्हाळ्यात नागरिकांसमोर पाणीप्रश्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here