नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचारप्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (Lakhimpur Kheri Violence Accused Aashish Mishra) याला मोठा धक्का बसला आहे. कारण या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत पुढील सात दिवसांमध्ये त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

लखीमपूर खिरी येथे काही महिन्यांपूर्वी थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं होतं. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात आशिष मिश्रा याला जामीन दिला होता. आता हा जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने मिश्रा याला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. ‘पीडितांची बाजू नीट ऐकून घेण्यात आली नव्हती आणि जामीन देण्यास घाई करण्यात आली,’ अशी टिप्पण्णी यावेळी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांची तातडीची बैठक; भोंग्यांबाबत मोठा निर्णय होणार?

सुप्रीम कोर्टात लखीमपूर प्रकरणाबाबत ४ एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. मात्र तेव्हा कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज कोर्टाने आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत त्याला आत्मसमर्पण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘लखीमपूर खिरीमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणं हा केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा एक सुनियोजित कट होता’, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता. तक्रारकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही एफआयआर दाखल केली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एका चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने ५ हजार पानांचा अहवाल दिला होता. तसंच या हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हाच मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here