अब्दुल बासित यांनी शाहबाज शरीफ यांचं ट्विट करत ही एक कमोजर प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे. काश्मीर हा मुद्दा नसून वाद आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, भारत समर्थित काश्मीरमधील हिंसाचाराचं काय असा सवाल अब्दुल बासित यांनी केला. कमांडर कुलभूषण जाधवचे काय? पाकिस्तानला असल्या क्षमा याचनेची गरज नाही, असं अब्दुल बासित यांनी स्पष्ट केलं.
पहिल्या चर्चेतच युद्धाची घोषणा करायला हवी होती का?
अब्दुल बसत यांच्या ट्विटला एका यूजरनं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या पहिल्या चर्चेतच युद्धाला सुरुवात करायला हवी होती का?, असा प्रश्न अब्दुल बासित यांना केला आहे. याच्या उत्तरात अब्दुल बासित यांनी भारताला अजून चांगल्या प्रकारे उत्तर देता आले असते, असं म्हटले आहे.
सजाद सईद नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करण्यात आी आहे. पाकिस्तानचं पहिलं औपचारिक समर्थन, ही एक कमजोर प्रतिक्रिया असून काश्मीरचा मुद्दा यामुळं कमजोर होतो. तर, ५ ऑगस्ट २०१९ ला भारतानं काश्मीरमधील ३७० कलम हटवलं होतं. त्या विरोधात पाकिस्ताननं जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम यामुळं झालं आहे. शरीफ कुटुंबाकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं हे आश्चर्यजनक नाही, असं देखील तो म्हणाला आहे.
सध्याचे पंतप्रधान पाकिस्तानचं प्रतिनिधीत्त्व करत नसून ते स्वत: वरील भ्रष्टाचाराचे आरोप मिटवण्याचं काम करत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या अजेंड्याप्रमाणं ते काम करत असल्याचा आरोप इनायत शाह यांनी केला आहे.