मुंबई : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हे भोंगे न हटवल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच हनुमान चालिसा वाजवावी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. यासाठी राज ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला ३ मेपर्यंताच अल्टिमेटमही दिला आहे. राज यांच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून मशिदीवरील भोंग्यांबाबत (Loud Speaker Azaan) लवकरच राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

‘राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे चर्चा करून संपूर्ण राज्यासाठी भोंग्यांबाबतचे धोरण ठरवणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

INS Vikrant : सोमय्यांची ३ तास चौकशी, ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ४ ओळीत प्रतिक्रिया

‘राज्यातील स्थिती नियंत्रणात’

महाराष्ट्रासह देशात मशिदीवरील भोंग्यांना विरोध होत असल्याने अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. तसंच कुठेही तणाव निर्माण झाल्यास स्थानिक पोलीस योग्य तो निर्णय घेतील, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राजकारण तापलं! राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा घेतल्यास….

दरम्यान, भोंग्यांवरून वातावरण तापलं असतानाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here