सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…
– अनिल देशमुख साहेबांवर १०३ रेड झाल्या आहेत हे विक्रम आहे
– माझ्या बैठकीत का घुसले? बातम्या बाहेर कशा आल्यात? म्हणून सुप्रिया सुळे पत्रकारांवर नाराज
– राजकारणात हनुमान एन्ट्री यावर कोण कसा आणी काय बोध घेईल कळत नाहीये
– छापे मारण्याचा विक्रम सुरू आहे.
– दंगली होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. सिल्व्हर ओकवर हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला होता.
– ज्या महिला त्या हल्ला प्रकरणात अटकेत आहे. त्यांना मला भेटायचं आहे. मी पोलिसांना विनंती केली आहे. त्या का माझ्या घरी आल्या होत्या? या पद्धतीने ही आपली संस्कृती नाही.
– जेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला. माझ्या मुलीने आणि आईने तातडीने पडदे बंद केले, तरी सुद्धा हे काय झालं कळायला मार्ग नाही. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवायचा प्रयत्न व्हायला हवा.
– यातून फक्त नुकसान आणि नुकसान होतं आहे, हे सगळं अस्वस्थ करणारं आहे.
– दिल्लीत आणि इतर ठिकाणी झालेली दंगलेने मी अस्वस्थ झाली आहे. हे कुणासाठी चांगलं नाही. यातून अर्थवावस्थेला फटका बसतो.
– काश्मीर फाइल्स हा वेदना देणारा सिनेमा आहे. तिकडे सगळे छान राहतात सुधारले आहे. त्या समाजबाबत जर तुम्हाला इतकं प्रेम आहे तर जम्मू काश्मीरच्या बजेटमध्ये काहीतरी टाका, बजेटमध्ये काहीच तुम्ही घेतलं नाहीये.