दरम्यान, भारतात आत्तापर्यंतआढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ५८६५ वर पोहचलीय तर करोनामुळे १६९ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, सुदैवानं जवळपास ४७८ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, मरकझ प्रकरणामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या वाढली.
मार्च महिन्यात दिल्लीच्या निझामुद्दीन भागात ‘तबलीघी जमात’च्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या अनेक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या. मरकझमधूनही अनेकांना बाहेर काढण्यात आलं आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांत क्वारंटाईन करण्यात आलं. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांत दाखल झालेल्या या ‘तबलीघी जमातीच्या’ कार्यकर्त्यांचा शोध सरकारकडून सुरू आहे.
दिल्ली सरकारनं घोषित केल्यानंतरही अनेक तबलीघी जमातचे लोक मरकझमध्ये मोठ्या संख्येनं आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय उपस्थित असल्याचं आढळलं होतं. यामध्ये अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर हे लोक वेगवेगळ्या राज्यांतील आपापल्या ठिकाणांवर निघून गेले. त्यातील अनेक जण करोनाबाधित असल्याचं आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही धोका निर्माण झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times