‘येणाऱ्या काळात मी टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल न भरण्याचं टेन्शनच संपून जाईल. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन-चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील’, असे आश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात बोलताना दिले.
धुळ्यात येतांना माझं मन शांत होतं…
धुळ्यात येतांना माझं मन शांत होतं कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जी काम सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेच काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दुसरे म्हणजे धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रस्तावावर बोलताना नितीन गडकरी यांनी खोचक टीका करत वक्तव्य केले की ‘धुळे शहरात कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचा ठेका दिला जातो तो दिवाळखोरीत जातो, त्यामुळे मला टेन्शन येते की ऑर्डर देऊनही कामे होत नाही. मात्र, मला आनंद आहे की ते सर्व काम पुन्हा सुरू झाले’, असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही…
‘राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही, जे नेते खोट स्वप्न दाखवितात त्यांच्याबद्दल तात्पुरता प्रेम असत आणि जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते’, असे म्हणत नितीन गडकरी यांनी काहींचे कान देखील यावेळी टोचले.