Rana vs Shivena | मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या तयारीत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांचे निवासस्थान असलेल्या खारमधील इमारतीला शिवसैनिकांनी वेढा घातला आहे.

हायलाइट्स:
- महाविकास आघाडीत आल्यापासून शिवसेना शांत झाली आहे
- शेवटी संयमालाही मर्यादा असतात
यावेळी त्यांनी आगामी काळात राज्यातील परिस्थिती आणखी बिघडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, असे सूतोवाचही केले. महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवरून टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते. या माध्यमातून दंगली भडकवण्याचे प्रकार होऊ शकतात. या सगळ्यामागे धर्माबद्दलची ओढ नव्हे तर मतांबद्दलची ओढ असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
तसेच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे काही लोकांना दु:ख झाले आहे. ते लोक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडच्या काळात नेत्यांच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. तसं असेल तर मग सगळ्यांच्या घराचे पत्ते सगळ्यांना माहिती आहेत, असे सूचक भाष्यही जयंत पाटील यांनी केले.
‘मोहित कंबोज यांच्या गाडीच्यापाठी शिवसैनिक लागले म्हणून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही’
शिवसैनिकांनी शुक्रवारी रात्री कलानगर परिसरात मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला होता. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा दावा केला होता. मात्र, जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला. एखाद्याच्या गाडीच्या पाठी कोणी लागले म्हणून लगेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, असे होत नाही. मोहित कंबोज यांना पोलिसांनीच वाचवले. त्यामुळे राज्यातील पोलीस दल सक्षम आहे, हे दिसून आल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : nowdays shivsena is not aggressive like old days says ncp leader jayant patil over navneet rana and ravi rana vs shivsena clash
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network