मुंबई: खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक ठिय्या देऊन बसले आहेत. यावरून भाजप नेत्यांनी गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी थेट घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांची मागणी वेगळी आहे. शरद पवार यांनी त्यावेळी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नव्हते, की ज्याचा राग यावा. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. तर शिवसेना आज जे करत आहे ते आंदोलन आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
मोठी बातमी : नरेंद्र मोदींमुळे राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर धडक देण्याचा हट्ट सोडला!
राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याचा चंगच बांधल्याने पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याचा आपला हट्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण माघार घेत असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
Enough is Enough! संजय राऊतांचा संयम संपला

‘राणा दाम्पत्याने घरी बसून हनुमान चालिसा वाचावी’

राणा दाम्पत्याकडून जे काही सुरु केले आहे, ते अनावश्यक आहे. हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी ती अमरावती किंवा मुंबईतील घरी बसून वाचावी. त्यासाठी अमुक ठिकाणी जाण्याचा हट्ट का धरला जात आहे? करोना काळातही मंदिरे बंद असल्यावरून भाजपकडून आंदोलने करण्यात आली. या सगळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाला असे दाखवायचे आहे की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही, असा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here