मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) हनुमान चालीसा पठणावरुन (Hanuman Chalisa Chanting) सुरु झालेला वाद थांबण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. मुंबई आपकडून (Mumbai AAP) ‘भाऊ बंधुत्त्व आणि एकतेची हनुमान चालीसा’ या नावानं ट्विटर स्पेसचं (Twitter Space) आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई आपनं या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र, मुंबई आपची हनुमान चालीसा पठणाची स्पेस ब्लॉक झाली. आपच्यावतीनं भाजप आयटी सेलवर आरोप करण्यात आले आहेत.
साहित्य संमेलनात सामान्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी; पुस्तक खरेदीला कमी प्रतिसाद
मुंबई आपनं ट्विटर स्पेस ब्लॉक झाल्यानंतर प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात भाजप आयटीसेलवर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आयटी सेलनं स्पेसवर रिपोर्ट केलं आणि व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आपनं केला. या घटनेतून भाजपची हनुमानाच्या प्रती असलेली श्रद्धा दिसून आली असून त्यांनी हनुमान चालीसा पठणाला विरोध केल्याचा आरोप आपच्यावतीनं करण्यात आला आहे. ट्विटर स्पेसवरील हनमान चालीसा पठणाला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये सहभागी होण्याऐवजी भाजपकडून अशा प्रकारे व्यतय आणला गेला, असा आरोप मुंबई आपच्यावतीनं करण्यात आला आहे.

हनुमान चालीसा हिंदू धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, भाजप, राणा दाम्पत्य, मनसे यांच्याकडून त्यांच्या राजकारणासाठी शांततापूर्ण आणि अध्यात्मिक वातावरणात करण्यात येणाऱ्या प्रार्थनेचा गैरवापर करत असल्याचा आरोप आपनं केला आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे हे खऱ्या हनुमान भक्ताचं वर्तन नाही, असं मुंबई आपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
नागपूर हादरलं! तरुण पोलिसाची घरातच आत्महत्या, नैराश्याचं कारण वाचून हादराल
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती मेनन शर्मा यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हनुमान आमच्या ह्रदयात आहेत. तर, हनुमानाच्या ह्रदयात भगवान राम आहेत. त्यामुळं ज्याच्या ह्रदयामध्ये बजरंग बली आहेत ती व्यक्ती इतरांना त्रास देण्यासाठी हनुमानाच्या नावाचा वापर करणार नाही, असं प्रीती शर्मा मेनन येंनी म्हटलं आहे. आम्ही त्यामुळं नावीन्यपूर्ण मार्गानं हनुमान चालीसा पठण करुन योग्य अर्थ राजकीय पक्षांना दाखवून देणार होतो. मात्र, भाजप, राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे यांनी विश्वास गमावल्यानं ते हिंदू धर्मात महत्त्व असणाऱ्या हनुमान चालीसा पठणाचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप प्रीती मेनन शर्मा यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here