औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते रविवारी विविध रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मात्र, याचवेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप-शिवसेना पुन्हा एकदा श्रेयवाद घेताना पाहायला मिळाली. तर याचवेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला.

मी मंत्री झाल्यापासून अगदी कामी कालावधीत औंरगाबाद जिल्ह्यासाठी महत्वाचे प्रकल्प मंजुर करून आणण्याचे काम केले. पण असे असतानाही चंद्रकांत खैरे नेहमी सांगतात की मी यासाठी आधीच पत्र दिले होते, असं म्हणत कराड यांनी खैरेंवर भर कार्यक्रमात निशाणा साधला.

आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?
कराड यावेळी बोलताना म्हणाले की, ‘मी केंद्रात मंत्री झाल्यापासून जिल्ह्यासाठी अनेक प्रकल्प आणले आहेत. पण माझे जुने मित्र माजी खासदार चंद्रकांत खैरे नेहमी सांगतात की मी यासाठी आधी अर्ज दिला होता, हे केलं होतं. त्यामुळे हे असे झाले की, त्यांनी लग्न करायचा विचार केला, पण त्यांनी काही मुलगी पाहिली नाही, मुलगी पसंद केली नाही आणि लग्नही केले नाही. पण आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखवलं’ असा टोला भागवत कराड यांनी खैरेंना लगावला.

करडांना अजून दिल्ली कळालीच नाही: खैरे

भागवत कराड यांनी केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत खैरे यांनीही त्यांना उत्तर दिले आहे. कराड आत्ता मंत्री झाले आहेत, त्यांना माहितीच नाही राज्यमंत्र्यांचे अधिकार काय असतात. असे असतानाच उगाच मुद्दाम असं-तसं बोलतात. माझ्याकडे एवढ्या मोठ्या फाईली पडून आहेत. गडकरी माझे मित्र आहे. कराड यांना काहीच माहीत नसून त्यांना अजून दिल्लीच समजली नाही. मी असंच बोलत नाही मी करूनही आणलं असं खैरे म्हणाले.

करोना नाही तर ‘या’ आजाराने मुंबईकर चिंतेत, तुम्हालाही लक्षणं दिसल्यास काळजी घ्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here