नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असेलल्या राजकीय गोंधळाचा पुढील अंक आता राजधानी दिल्लीत पाहायला मिळत आहे. पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे अन्य काही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपच्या या शिष्टमंडळाकडून केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यात येणार आहे. या भेटीआधी किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरादार टीकास्त्र सोडलं. (Kirit Somaiya News Today)

‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोलिसांच्या आधारे माफियाराज चालवत आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही केंद्रीय गृहसचिवांकडे राज्यातील सर्व घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करणार आहोत,’ अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Jitendra Awahd: भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत; आव्हाड म्हणतात, राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल ….

ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर एकदा नव्हे तर तीनवेळा पोलिसांच्या मदतीने हल्ला करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उद्धटगिरीला सीमा राहिलेली नाही. पोलिसांकडून खोटी एफआर दाखल करण्यात येत आहे. तुम्हाला २० फूट खाली गाडू अशी धमकी शिवसेनेचे प्रवक्ते देतात. या सगळ्या घटनांची आम्ही सविस्तर माहिती केंद्रीय गृहसचिवांना देऊ,’ असं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here