ठाणे : डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. हा वीज पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सध्या वीज नसल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. (Electricity Supply Failure)
दरम्यान, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.