आता असाच प्रयोग करत झळकणारा भूलभुलैया २ हा सिनेमा पहिल्या भागाप्रमाणे घाबरवणारा नसून लोटपोट हसवणारा तर आहेच. पण पहिल्या सिनेमातील कथेपासूनही वेगळा असल्याचं ट्रेलरमधून दिसतय. काहीही असलं तर भूलभुलैया सिनेमाच्या फिव्हरमधून अजूनही बाहेर न आलेल्या चाहत्यांना मात्र या सिनेमाच्या सिक्वेलच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.
सिध्दार्थ चतुर्वेदी आणि अवनी यांच्या लग्नानंतर सुरू होणारी भूलभुलैया या सिनेमाची गोष्ट म्हणजे एक गूढ भयकथा होती. सिध्दार्थ आणि अवनी यांच्या नात्याला राधाची नजर लागली की त्या महालातील एका खोलीत बंद असलेल्या मंजुलिकाची हे पाहण्यात वेगळीच मजा होती. अवनी आणि या भूमिका विद्या बालनने अप्रतिम रेखाटल्या. तर राधावर मानसिक उपचार करण्यासाठी आलेल्या सिध्दार्थच्या मित्राची म्हणजे डॉ. आदित्यच्या भूमिकेत अक्षयकुमारने बाजी मारली. भूलभुलैयाची ती भट्टी अशी काही जमली की काही विचारूच नका.
खरं तर गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये या सिनेमाचा सिक्वेल येणार होता, पण करोनामुळे सगळं ठप्पं झालं आणि या सिनेमाच्या शूटिंगमध्ये खो आला. आता येत्या २० मेला रिलीज होणाऱ्या भूलभुलैया २ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला आहे. ‘भूलभूलैया २’ मध्ये मात्र कलाकारांपासून कथानकापर्यंत सगळंच चित्र बदलल्याने काही प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या जागी या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीची केमिस्ट्री दिसणार आहे. तर तब्बूचीही खास भूमिका आहे.
नव्या संचातील ट्रेलर पाहून प्रेक्षक मात्र अक्षयकुमार, विद्या बालन, परेश रावल, शायनी आहुजा, अमिषा पटेल यांची उणीव भासत असल्याची कमेंट करत आहेत. तर पहिल्या भागातील रहस्य, भीती, मंजुलिकाचा लूक हे सिक्वेलमध्ये दिसणार नसून भूलभुलैया टू फूल टू कॉमेडी असणार असं ट्रेलरमध्ये दिसत आहे.