औरंगाबाद : गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असून, आज ( गुरुवारी ) दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं समोर आले आहे. तसेच परवानगी देताना काही अटी आणि शर्ती सुद्धा घालून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बहुचर्चित औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.

खासदार बाळू धानोरकर यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, काहीच मिळालं नाही म्हणून…

राज ठाकरेंच्या सभेसाठी असणार ‘या’ अटी-शर्थी

१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे

२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

५) 1 मे रोजीमहाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे

८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

९) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.

Weather News : पुढील ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे, हवामानाकडून भयंकर उष्णतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here