नवी दिल्ली :पद्मश्री पुरस्कार विजेते (Padmashree Award Winner) आणि ओडिशी नृत्य कलाकार गुरू मायाधर राऊत यांना त्यांच्या दिल्ली येथील सरकारी निवासस्थानातून बुधवारी हाकलून देण्यात आले. दिल्ली येथील एशियन गेम्स व्हिलेज येथे ही घटना घडली. सरकारी निवासाची अंतिम तारीख २०१४मध्ये संपुष्टात आली असून, तेथून बाहेर पडण्याबाबतच्या नोटिशी आधीच दिल्या होत्या, असे सरकारकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले. राऊत यांच्यासह इतर कलाकारांनीही न्यायालयात धाव घेतली होती; पण ते केस हरले. त्यांनी घराबाहेर पडण्यासाठी २५ एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

मुलीच्या हाताचा आधार घेऊन घराबाहेर पडलेल्या राऊत यांचे एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेले दृश्य पाहून विविध प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. पद्म पुरस्काराचे त्यांना प्रदान करण्यात आलेले फ्रेम केलेले प्रमाणपत्रही रस्त्यावर पडलेले त्यात दिसत आहे.

महाराष्ट्राचे केंद्राकडे हजारो कोटी रुपये थकित; महत्त्वाची आकडेवारी उघड

घर सोडण्याबाबतची कृती कायदेशीर असली, तरी ते ज्या पद्धतीने केले गेले, ती पद्धत चुकीची असल्याचे राऊत यांच्या मुलीने सांगितले. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान मोदी यांच्या सत्तेखालील सरकारला कलाकारांचा मुळीच आदर नसल्याची टीका मधुमिता यांनी केली. सरकारने २०१४मध्ये घरे रिकामी करण्याबाबतीतला निर्णय घेतला असेलही; पण तो आम्हाला २०२०मध्ये मिळाला. राजीव गांधी यांनी सरकारी निवासाची सोय केल्यामुळे कदाचित हा राजकीय खेळ तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here