या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळूनही प्राइम टाइम मिळत नसल्यानं अभिनेता अक्षय वाघमारेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. अक्षय वाघमारे हा डॅडी अरुण गवळीचा जावई. सिनेमातही त्यानं पायदळ प्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांची भूमिका साकारली आहे. त्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
‘मुस्लिमांवरील हिंसाचाराचा उत्सव होतो हे पाहून वाईट वाटतं’
काय म्हटलंय अक्षय वाघमारेनं?
नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे
मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम
मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही .
याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे पण पुढे काहीच साध्य झाले नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला . फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा.
स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शोचे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का ?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही ? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील .
मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत.जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार?
बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.

पहिल्याच दिवशी कोटींची कमाई
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानचा वध केला तो प्रसंग, त्यामागची शिवाजी महाराजांची रणनिती, त्यांचे युध्दकौशल्य, मावळ्यांची साथ, नेतृत्वगुण यांचा मिलाफ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या सिनेमाची भट्टी जमून आल्याचा फायदा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दिसला. २२ एप्रिलला पहिल्या दिवशी ३०० थिएटर्समध्ये ७०० शो लावण्यात आले जे हाउसफुल्ल झाले. तर दुसऱ्याच दिवशी ४५० थिएटर्समध्ये १२०० शो लागले आहेत. पहिल्या दिवशी १ कोटी ५ लाखांचा गल्ला या सिनेमाने जमवला.
जाणून घ्या काय असते राजभाषा, राष्ट्रभाषा आणि मातृभाषा
हे यश आमचे नसून शिवाजी महाराजांचे आहे असे म्हणत या टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. देशभरातच नव्हे तर जगभरातील सौदी अरेबिया, दुबई, , ऑस्ट्रेलिया, फिनलँड, कुवैत, ओमेन, बहारीन, कतार येथेही या सिनेमाला पसंती मिळत असून अमेरिकेतील वीकेंड शोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्रपट समीक्षकांच्या आकडेवारीतून दिसत आहे.