मुंबई : भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत शिवसेनेवर टीका केली. बाबरी मशीद पडले त्यावेळी कोणत्या बिळात होते, असं म्हणत होते. अरे बाबांनो मशीदीवरील भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आहे. बाबरी मशिदीचा तो ढाचा होता त्याला मशीद मानत नाही. कार सेवा करताना मी बदायूंच्या तुरुंगात १८ दिवस होतो. बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. बाबरी मशीद पडली त्यामध्ये ३२ आरोपी होते, तुमचा महाराष्ट्रातील कुठलाच नेता पाहायला मिळत नाही. आमचे नेते ३० वर्ष खटले लढत होते. आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि शिस्तही मोडता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भगवी शाल द्याल असं वाटलं, पण त्याची मला काही गरज नाही, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
बाबरीचा ढाचा कोणी पाडला तर तो कार सेवकांनी पाडला असं सांगायचा निर्णय झाला होता. कल्याण सिंग यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही गोळीबार करण्यास परवानगी दिली नाही. तिथं साडेतीन लाख कार सेवक होते त्यांच्यावर मी गोळी चालवू देणार नाही म्हणाले. कल्याण सिंग यांनी सरकार पणाला लावला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राम अस्तित्वात होते का असा सवाल विचारला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, असा आरोप देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं जाहीर केलं होतं. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. त्यांनी मला सांगितलं असतं तर माझ्या घराबाहेर म्हणायला सांगितलं असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हनुमान चालीसा म्हणण्याच्या मागं त्यांचा राज्य सरकार उलटवण्याचा डाव होता, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
धारदार हत्याराने डिक्की फोडून, बॅगा फाडून करत होते चोऱ्या, पोलिसांनी ‘अशी’ पकडली टोळी
काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखा वाघ तयार झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधक म्हणतात पाकिस्तानबद्दल बोलता चीन बद्दल बोलाना पण तुम्ही ज्यांच्या बरोबर बसलात त्यांनी चीनला जमीन दिली. डोकलाम आणि गलवानमध्ये चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. चीनच्या सैन्याला शस्त्राशिवाय मागं पाठवलं, त्यांच्यावर तुम्ही संशय व्यक्त करता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here