Asaduddin Owaisi | राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादमध्ये असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील मुस्लिमांच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.

 

Owaisi
Asaduddin Owaisi |भाजप स्वत:च निकाल देत आहे. त्यामुळे आता देशात न्यायव्यवस्थेची गरजच उरलेली नाही.

हायलाइट्स:

  • भाजप मुस्लिमांना सामूहिक शिक्षा देतंय
  • देशात इस्लामविरोधी हवा
औरंगाबाद: महाराष्ट्रात सध्याच्या घडीला जे काही सुरु आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजपने देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे. त्याचेच परिणाम सध्या देशातील मुस्लिमांना भोगावे लागत आहेत, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी भारतात सध्या मुस्लीमद्वेषी वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले. देशातील सेक्युलर पक्ष आणि भाजपमध्ये सध्या स्पर्धा लागली आहे. कोण हिंदुत्वाच्या विचारधारेवर जास्त चालेल, यासाठी चढाओढ आहे. त्यामुळेच देशात संविधानविरोधी विधाने केली जात आहेत. या सगळ्याचा फटका देशातील मुस्लिमांना बसत आहे. जहाँगीरपुरा, सेंधवा, खरगौन याठिकाणी मुस्लीम समुदायातील लोकांची घरे पाडण्यात आली. भाजपकडून मुस्लिमांना सामूहिक शिक्षा दिली जात आहे. भाजप स्वत:च निकाल देत आहे. त्यामुळे आता देशात न्यायव्यवस्थेची गरजच उरलेली नाही. उद्या दिल्लीत बसलेल्या अमित शहा यांना कोणाचे घर तोडावेसे वाटले तर ते तोडू शकतात. त्यासाठी न्यायव्यवस्थेची गरज उरलेली नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.
Raj Thackeray’s rally : ‘देशातील मदिंरांवरीलही भोंगे हटवा, परंतु आधी…’; राज ठाकरेंचे देशभरातील हिंदूंना ‘हे’ आवाहन
देशातील मुस्लिमांवर अत्याचार सुरु असताना कोणताही राजकीय पक्ष तोंड उघडायला तयार नाही. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. मला द्वेषाचे राजकारण करायचे नाही. पण वेळ येईल तेव्हा मी औरंगाबादमध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये सभा घेईन, असेही ओवेसी यांनी सांगितले.
Raj Thackeray: शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी: राज ठाकरे
भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला

राज ठाकरे यांच्या सभेनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही मनसेवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला. राज ठाकरे आपल्या भाषणात सांगत आहे की भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, हे मलाही मान्य आहे, मग अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची होती? २०१४ ते २०१९ पर्यंत भाजपचं सरकार सत्तेत होते, त्यावेळी राज ठाकरे का बोलले नाहीत? असा रोकडा सवालही जलील यांनी विचारला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mim chief asaduddin owaisi says muslims are collectively punished in india after raj thackeray rally in aurangabad
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here