नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी रायगडावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत एक वादग्रस्त दावा केला. ब्राह्मण समाजातील महापुरुषांबद्दल विष पेरलं जात असून शिवरायांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळक यांनीच बांधली असल्याचा दावा राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत केला. राज यांच्या या दाव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनीही या वादाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘जबाबदार व्यक्तींनी इतिहासाबद्दल तथ्यांना धरून बोलावं. लोकमान्य टिळक यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे,’ अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे. तसंच महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधली आणि त्यानंतर तिथं पूजा सुरू झाली. त्यानंतर १९२५ मध्ये ही समाधी बांधली. शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

जोधपूरमध्ये झेंड्यावरुन दोन गट भिडल्यानं दगडफेक; पोलिसांचा लाठीमार, इंटरनेट बंद

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. खासदार होताना माझी भूमिका स्पष्ट होती की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची भूमिका ताकदीने मांडायची. आता कार्यकाळ संपल्यानंतरही ही शिव-शाहूंची भूमिका आणखी जोरदारपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.

‘राजकीय भूमिका जाहीर करणार’

खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची आगामी काळातील राजकीय वाटचाल कशी असणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ६ मे रोजी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मी मुंबई किंवा पुण्यात लोकांसमोर माझी आगामी राजकीय भूमिका काय असणार, याबाबतची घोषणा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘शरद पवार यांना हिंदू या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे’; राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here