प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या परशुराम घाटातील वाहतुकीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पण या पर्यायी मार्गावरून फक्त हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या एसटीला मात्र परवानगी देण्यात आली नसल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत.

दुपारी १२ ते ६ या वेळेत या मार्गावरून चिपळूण रत्नागिरीहून दापोली-खेड मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या वेळेतही बदल झाला आहे. खरंतर, पर्यायी मार्गाचे नियोजन करताना किमान ट्रक सदृश्य अवजड वाहतूक वगळून एसटी बसेस जाऊ शकतील इतपत या मार्गाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. रत्नागिरी परिवहन विभाग नियंत्रकांकडून परवानगी मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, पर्यायी मार्गावरुन एसटी प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळू शकलेली नसल्याची माहिती परिवहन विभागाच्या उच्चपदस्थ सुत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या भेटीला
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटातील दुरूस्तीचा प्रश्न गेले कित्येक महिने रखडलेला होता. यानंतर आता पावसाळयाला काही दिवस शिल्लक असताना हे दुरुस्ती काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी येथील वाहतुक वेळेत बदल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, हा महामार्ग ३ मे मंगळवारपासून २५ मे या कालावधीत दुपारी १२ ते ६ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. इतकंच नाहीतर, वाहतुकीसाठी बंदी असताना कमी वजनाची (Light Vehicle) वाहतुक पर्यायी मार्गाने सुरू आहे. आमडस चिरणी लोटे रस्ता, कळंबस्ते आमडस धामणंद रस्ता या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र, या सगळ्याचा त्रास वाहनचालक व प्रवासी यांना होऊ लागला आहे.
कोर्टाने झापलं पण वळसे पाटील ठाम, म्हणाले ‘अभ्यास करुनच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here