एमआयडीसी अग्निशमन विभागावर गंभीर आरोप
भीषण आगीमुळे शहरात खळबळ उडाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील स्थानिक नगरसेवक आणि शहराच्या माजी महापौरांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. एमआयडीसी अग्निशमन विभागाकडे अग्निशामक वाहनांची कमरता असून गाड्या नादुरुस्त असल्यानेच त्यांना दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे. याबाबत अद्याप एमआयडीसी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
नवी मुंबईतील आग तब्बल ८ तासांनंतर आटोक्यात; ३ कामगार जखमी, अन्य दोघे बेपत्ता – navi mumbai midc fire under control after 8 hours; 2 workers injured, two others missing
नवी मुंबई : शहरातील पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर नियंत्रणात आली. मात्र या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले असून अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. आग आटोक्यात आली असली तरी आज सायंकाळपर्यंत कुलिंगचे काम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Navi Mumbai Fire News)