राज ठाकरे यांना लगावला टोला
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराने विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘मला राज ठाकरे यांचं २००८ चं परप्रांतीयांबाबत केलेलं भाषण तर आठवत नाही, मात्र त्यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी केलेली विविध भाषणं मला नक्कीच आठवत आहेत. या भाषणांनी मी देखील प्रभावित झालो होतो. कारण तेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणात तरुणांचे, गोर-गरिबांचे विषय होते. राज ठाकरे तेव्हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर बोलत होते,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला भक्तीची, अध्यात्माची उच्च परंपरा आहे. अनेकदा अचानक अडचणीचा प्रसंग येतो आणि आपण त्यातून सहीसलामत मार्ग काढतो, यामागेही भक्ती आणि अध्यात्माची एक अदृश्य शक्तीच असते, असं माझं मत आहे. त्यामुळंच अध्यात्मावर, ईश्वरावर माझी श्रद्धा आणि भक्ती आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकतीच तीर्थयात्रेची सुरुवात केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची ही यात्रा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Z19cisw3Mt1BAYxVyClkmcrQBcNWCwWT9xXoA