मुंबई : स्टार प्रवाहवरची आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय आहे. जवळ जवळ रोजच त्यात घटना घडत आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, आशुतोष, संजना यांच्याभोवतीच ही कथा असली, तरी या मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेची एक बाजू दाखवली जाते. ती प्रेक्षकांना पटतेही. अलिकडेच मालिकेत संजनाचा आत्महत्येचा प्रयत्न, गौरी-यशचं एकमेकांपासून दुरावत जाणं या घटना सुरू आहेत. त्यात अरुंधती ओढली जाते. मग आशुतोष-अरुंधतीचा ट्रॅक बाजूला तर पडत नाही ना, असं प्रेक्षकांना वाटत होतं.

आई कुठे काय करते

अरुंधतीला काही दिवसापूर्वी एका सिनेमात गाण्यासाठी ऑफर आली. तिच्या आयुष्यात होणारे हे बदल आता वेगवान होणार आहेत. आशुतोष आणि अरुंधती यांना एकत्र गाण्यासाठी विचारणा होणार आहे. त्यासाठी दोघंही होकार देणार आहेत.

‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि स्वीटूच्या मालिकेत आहे एक साम्य


नुकताच आशुतोषच्या सांगण्यावरून अरुंधतीनं नवा चष्मा केला. अर्थात, नव्या चष्म्यातून अरुंधतीचा दृष्टिकोनही बदलतो आहे का? ती आशुतोषसोबतच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात करणार का? येत्या काही दिवसात हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. आशुतोष-अरुंधतीच्या ड्युएटवर देशमुख कुटुंबाची काय प्रतिक्रिया असेल, हेही पाहायला मिळणार आहे.

अन् राणाजींनी आयुष्यभरासाठी पकडला पाठक बाईंचा हात, हार्दिक आणि अक्षयाची लव्हस्टोरी एकदा वाचाच!

काही दिवसांपूर्वी आशुतोष अरुंधतीला आय लव्ह यू म्हणायला जात होता. पण मध्येच अडथळे आले. अरुंधती आणि आशुतोष गप्पा मारताना, अरुंधती म्हणते आपण आनंदानं जगायला इथे आलो आहोत. नकोत त्या कटकटी. आयुष्य सुंदर आहे. त्यावर आशुतोष तिला आय लव्ह यु म्हणतो. तो असंही म्हणतो की माणसाच्या आयुष्याचा काही भरवसा नाही. मनातलं सांगून टाकलं पाहिजे. उद्याची काय खात्री? अर्थात, अरुंधतीला याची कल्पना असल्यानंच ती ते टाळतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here