धुळे : जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा अधिक असताना नागरिकांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही.
एका अग्निशामक बंबने किती नागरिकांची तहान भागणार? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या काळात जर दोन ते तीन दिवसात नागरिकांना पाणी मिळाले नाही तर धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या तोंडावर चपला आणि जोड्याने मारू, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.