रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आता गर्दीच्या स्थानकातील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आजपासून लागू होत आहे.

 

central railway increases platform ticket from rs 10 to rs 50
फलाट तिकीट ५० रुपये, साखळी ओढण्याचे प्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा उपाय
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. गर्दीमुळे आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार वाढत असल्याने, यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने गर्दीच्या स्थानकातील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारपासूनही दरवाढ लागू होणार असून, २३ मे पर्यंत कायम राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनेवल स्थानकात फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी अनेक नातेवाईक थेट रेल्वे गाडीत प्रवेश करतात. गाडी सुरू झाल्यानंतर साखळी ओढून गाडी थांबवून प्रवासी उतरतात. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या, तसेच लोकलच्या वक्तशीरपणावर होतो. यामुळे पंधरा दिवसांसाठी तात्पुरती तिकीट दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकावरील फलाट तिकीट वाढवण्यात आलेले नाही, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. करोनाकाळातही मध्य रेल्वेने फलाट तिकीटाचे दर वाढवले होते. गर्दी ओसरल्यावर काही आठवड्यात हे दर मागे घेऊन फलाट तिकीट पुन्हा दहा रुपये करण्यात आले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : central railway increases platform ticket from rs 10 to rs 50
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here