सातारा : साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ज्यांनी मला जातीवादी म्हणून हिनवले त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यामुळे लोक हसतात. अशी विधान लोक गांभीर्याने घेत नाहीत. लोक ऐकतात आणि सोडून देतात असे सांगत पवारांनी टिकाकारांना टोला लागवला आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार याबाबत योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल याची अंमलबजावणी कधी होईल याच्याकडे आमचं लक्ष राहील असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीला भाजप टारर्गेट करत आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांना झोपसुद्धा येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा कार्यक्रम त्यांचा आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे असे सांगत भाजपवर शरद पवार यांनी निशाणा साधला.

आधी महाआरती केली, नंतर मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी जेवण; वसंत मोरेंची पुन्हा चर्चा
आज देशात महागाई वाढली आहे, बेकारी वाढली आहे. या विषयाकडे न पाहता भोंग्याचे विषय घेतले जातात. ज्यांना आधार नाही ते अशी लोकांची मन भरकटवण्याचा प्रयत्न करतात, अशी नाव न घेता राज ठाकरेंवर पवारांनी टीका केली आहे.

आषाढी वारीची तारखी ठरली, यंदा कसं असणार पालखी सोहळ्याचं नियोजन? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here