Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला घाबरते, असे त्यांनी म्हटले. मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात राज ठाकरे यांनी नुकतेच जाहीर पत्र लिहून राज्य सरकारला जाहीर इशारा दिला होता. राज ठाकरे यांचे हे पत्र अत्यंत समर्पक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असूनही त्यांना ९६ हजार मते मिळाली
- एकटं लढूनही भाजपला ७८ हजार मते मिळाली
यावेळी त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असूनही त्यांना ९६ हजार मते मिळाली. तर एकटं लढूनही भाजपला ७८ हजार मते मिळाली. आणखी ९ हजार मतं तिकडूनची इकडे झाली असती तर निकाल वेगळा लागला असता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी ३२ हजार मतं मिळाली तर भाजपला एकट्याला ७८ हजार मते मिळाली. हाच पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादासंदर्भातही भाष्य केले. मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात राज ठाकरे यांनी नुकतेच जाहीर पत्र लिहून राज्य सरकारला जाहीर इशारा दिला होता. राज ठाकरे यांचे हे पत्र अत्यंत समर्पक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही. महाविकास आघाडीचा व्यवहार आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय, असा आहे. याला अटक कर, त्याला पकड , खोटे पुरावे, खोट्या केसेस केल्या जातात. अगदीच काही नाही तर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा हाताशी धरून घरांना नोटीस दिल्या जातात. या सगळ्याला कोणताही धरबंद उरलेला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : sharad pawar and maha vikas aghadi having fear of bjp says chandrakant patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network