अकोला: शहरात काल एक हटके लग्नसोहळा पार पडला. या लग्नात नवरदेव-नवरीच्या मुलांसह नातूही वरातीत थिरकतांना दिसले. यातील नवरदेव ६८ वर्षांचा तर नवरी ५८ वर्षांची, कुणाचं होतं हे लग्न? कसं झालं ते? लग्नात नवरी-नवरदेवाचे मुलं आणि नातूही कसे होते असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला होता. मात्र, हे लग्न कुणाचं होत याचा अखेर खुलासा झाला आहे.

हे लग्न दुसऱ्या तिसऱ्याचं नसून गुलाबराव गावंडेंच होतं. गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस होता. गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल ४१ वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि नातेवाईकांनी. अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा विवाहसोहळा पार पडला.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न : अजित पवार
लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. गुलाबराव गावंडेंना संग्राम आणि युवराज हे दोन मुलं आहेत. संग्राम हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यासोबतच शितल आणि स्वाती या दोन मुलींसह सात नातवंडही आहेत. गुलाबरावांच्या वरातीत संपूर्ण गावंडे परिवारानं अनेक गाण्यांवर भन्नाट नृत्य केलं. या वरातीत त्यांचे मित्र, कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकही सहभागी झाले होते. लग्नाची वरात हा या सोहळ्यातील आनंदाचा परमोच्च क्षण होता.
राज ठाकरेंना धमकीचं पत्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here