मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या गोष्टींना फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले. आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात एक परंपरा चालत आली आहे. कसं बोलावं, काय बोलावं, याचं प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. हे जे काही बोलतायत ही एक विकृती आहे. अशा पद्धतीने कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. राजकारणात वेगवेगळे विचार आणि मते असू शकतात. पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची महाराष्ट्रात कधीही पद्धत नव्हती. विरोधी पक्ष असो कुणीचं अशा प्रकारची वक्तव्य करु नये. मी अशा वक्तव्यांचा निषेध करतो, असे अजित पवार यांनी म्हटले. (NCP leader Ajit Pawar slams Ketaki Chitale)
मोठी बातमी: केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, अटक होणार?
तसेच प्रसारमाध्यमांनी या सगळ्या गोष्टींना फार महत्व देऊ नये, असे अजित पवार यांनी सांगितले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींनी येऊन जनतेला आवडणार नाही, अशी कृती करु नये. महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करु नका, असे अजित पवार यांनी सांगितले. या सर्व गोष्टी ३०० वर्षांपूर्वी घडून गेल्या आहेत. आज आपल्यासमोर बेरोजगारी, महागाई आणि इंधन दरवाढ यासारखे प्रश्न आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले.

केतकी चितळेंवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी या सर्व प्रकरणावर फार बोलणे टाळले. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटायला हव्या | छगन भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here