नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनती राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर टीका केली. रवी राणा यांनी यावेळी पत्रकार परिषद सुरु असताना मुख्यमंत्री मंत्रालयात दोन वर्षानंतर गेले, विदर्भ दौरा, हनुमान चालीसा, राजद्रोह, संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराज जयंती या मुद्याचं नवनीत राणा यांना प्रॉम्पटिंग केलं. खासदार राणा यांनी यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मंत्रालयाचा मुद्दा
नवनीत राणा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका सुरु केली. यानंतर रवी राणा यांनी नवनीत राणा यांना मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात गेल्याची आठवण करुन दिली. यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यानंतर आमदार राणा यांनी विदर्भ दौऱ्याचा मुद्दा सांगितला. नवनती राणा यांनी नंतर मुख्यमंत्री विदर्भात कोणत्या गावात आणि कुठं गेले याबद्दलचा एक व्हिडीओ दाखवा असा नवनीत राणांनी सवाल केला.
Andrew Symonds Death : त्याचं खूप लवकर जाणं धक्कादायक, हरभजन सिंगची सायमंड्सला आदरांजली
संभाजी महाराज जयंती आणि हनुमान चालीसा, गदेचा अपमान
मुख्यमंत्री बेरोजगारीवर एकही शब्द बोलले नाहीत. महाराष्ट्रात २०१९ नंतर बेरोजगारी तीनपट वाढली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेल्यावर महाराष्ट्रात तीनपट बेरोजगारी वाढली असं नवनीत राणा म्हणाल्या. काल संभाजी महाराज यांचा दिवस होता, अभिवादन दिवस होता, असं त्या म्हणाल्या, यावेळी रवी राणा यांनी संभाजी महाराजांची जयंती असल्याची आठवण करुन दिली. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलू शकत नाहीत, असा आरोप केला.
लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
काल एका खासदारानं संकटमोचन हनुमानाची गदा दिली, असं नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गदेचा अपमान केल्याचा मु्द्दा रवी राणा यांनी नवनीत राणा यांना सांगितला. काश्मीरमध्ये जाऊन मी हनुमान चालीसा म्हणू शकते तर मुंबईत का म्हणू शकत नाही, असा सवाल नवनती राणा यांनी केला. महाराष्ट्रातल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी हनुमान चालीसा पठण करत होते, असं नवनीत राणा म्हणाल्या.

सत्तेचा दुरुपयोग महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून करण्यात येत आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी रवी राणा यांनी राजद्रोहाचा मुद्दा राणांना सांगितला. यानंतर रवी राणा यांनी औरंगजेब आणि छत्रपती संभाजीराजे यांचा मुद्दा सांगितला. महाराष्ट्रात लाचार मुख्यमंत्री आहेत, याचं दु:ख वाटतं असं नवनीत राणा म्हणाल्या. रवी राणा यांनी १० जनपथच्या मातोश्रीचा मुद्दा रवी राणांनी सांगितला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महिलेविरुद्ध लढण्यास का भीती वाटते, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर उद्धव ठाकरे चालत नसल्याचा मुद्दा देखील रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या लक्षात आणून दिला यानंतर खासदार राणांनी टीका केली.

बाळासाहेब ठाकरे असली होते,पण उद्धव ठाकरे नकली आहेत | किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here