पेशावरमध्ये सुमारे १५ हजार शीख राहतात. त्यातील बहुतेक जोगन शाह येथे वास्तव्यास असून विविध व्यवसायांत गुंतलेले आहेत. काही जणांची औषधांची दुकाने आहेत. देशातील अल्पसंख्याक शीख नागरिकांवर याआधीही अनेकदा जीवघेणे हल्ले झाले आहेत.
दोषींना शिक्षा देण्याची भारताची मागणी
खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये करण्यात आलेल्या दोन शीख व्यावसायिकांच्या निर्घृण हत्येचा पाकिस्तानने प्रामाणिकपणे तपास करावा आणि दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भारताने रविवारी केली. अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाघची यांनी सांगितले.
अमरिंदर यांच्याकडून निषेध
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोन शीखांच्या हत्येचा निषेध केला. शेजारील देशाचे सरकार शीख समुदायाच्या लोकांना खोटी आश्वासने देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मी भारताच्या पंतप्रधान कार्यालयाला ही बाब गांभीर्याने घेण्याची विनंती करतो’, असे ट्वीट अमरिंदर यांनी केले आहे.