मी आत्ता शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही. कारण आनंद दिघे गेले तेव्हा आमच्या सगळ्यांवर आघात झाला होता. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब ठाकरे मी पाहिले आहेत. आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे ही दोन्ही अजब रसायनं होती. त्याचं वर्णन नाही करता येणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
शेवटच्या सीनमध्ये नेमकं काय?
‘धर्मवीर’च्या शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी सिंघानिया रुग्णालयात गेले होते. हे सर्व प्रसंग शिवसैनिकांसाठी अंगावर काटा आणणारे आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग बघण्याचे टाळले. मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात. चित्रपटातील हा प्रसंग संपताच उद्धव ठाकरे हे थिएटरमधून बाहेर पडले.
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ची घसघशीत कमाई
धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट. १३ मे रोजी हा चित्रपट मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल होते. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दी जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.पहिल्या दिवशीच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.७५ ते १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समजते. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.