२५ वर्षांपेक्षा जास्त काळ युती केली आणि मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केलीत, असा आरोप नारायण राणे यांनी केला. अडीच वर्षात तुम्ही काय काम केलं नाही. मंत्रालयात जायचं नाही, व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे भाषण, असं काम सुरु असल्याचा आरोप राणे यांनी केला. आता पुळचट शिवसैनिक असल्याचा आरोप राणे यांनी केला. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला. तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाही, असं नारायण राणे म्हणाले.
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर कुणी कसे पैसे घेतले हे पाहिलं आहे. नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध दिसत असताना मंत्रिपदावरुन काढलं नाही, असा आरोप राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांची संगत उद्धव ठाकरे यांनी भोवल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. ईडीची चौकशी झाली तर ती सुडानं करत असल्याचा आरोप केला जातो. तुम्ही लोकांच्या घरांवर कारवाया करत ते कसल्या भावनेनं करता, असा सवाल राणे यांनी केला. नारायण राणे यांनी यावेळी यशवंत जाधव यांचा दाखला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा असं आवाहन केलं होतं. मात्र, राज्य सरकारनं केलं नाही. मुख्यमंत्र्यांना राजकोषीय तूट यातील काही कळत नाही. विकास कामांवर कसा पैसा खर्च करणार हे कळत नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सत्ता लंपट आहेत,खुर्चीसाठी प्रयत्न सुरु आहे | गिरीश महाजन