कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खाब झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनी टीव्हीच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. आपल्या देशाकडे केवळ एका दिवस पुरेल इतकं पेट्रोल शिल्लक असल्याचं विक्रमसिंघे म्हणाले. आपल्याला कोणत्याही कुटुंबाला, व्यक्तींना वाचवायचं नाही. आपल्या देशाला वाचवायचं असल्याचं रानिल विक्रमसिंघे म्हणाले.नव्या पंतप्रधानांचा रोख हा माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे होता.
पुण्यात राडा, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण, सुप्रिया सुळेंकडून तीव्र शब्दात निषेध

विक्रमसिंघे यांनी देशातील जनतेला आपल्यासाठी येणारी काही महिने अडचणींचे आणि आव्हानात्मक असतील, असं म्हटलं. मी कोणत्याही सत्य आणि सद्यस्थितीला आपल्यापासून लपवणार नाही. मला जनतेशी खोटं बोलायचं नाही, असं देखील रानिल विक्रमसिंघे म्हणाले. आपल्यासमोरील स्थिती भीतीदायक असली तरी ती वास्तव असल्याच ते म्हणाले. मात्र, आपल्याला परराष्ट्रातून मदत मिळेल, असं देखील रानिल विक्रमसिंघे म्हणाले.

श्रीलंकेला देशाचा कारभार चालवण्यासाठी २.६ ट्रिलियन श्रीलंकन चलनाची गरज आहे. मात्र, सरकारला सध्या १.६ ट्रिलियन महसूल मिळत आहे. श्रीलंकेसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचं सरकारनं पहिल्यांदा मान्य केलं आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडील परकीय चलन संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं श्रीलंका इंधन तेल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करु शकत नाही.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सरकाही हवाई कंपनीचा तोटा वाढल्यानं त्याचं खासगीकरण केलं जाणार असल्याचं जाहीर केलं. हवाई कंपनीच्या तोट्याचा भार जे लोकं कधीचं विमानानं प्रवास करत नाहीत त्यांना देखील सोसावा लागत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसैनभाई दलवाई यांचे निधन
१९४८ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका पहिल्यांदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परकीय चलन संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं आतंरराष्ट्रीय बाजारातून खरेदी करता येत नाही. दुसरीकडे केवळ एका दिवसाचं पेट्रोल शिल्लक आहे. त्यामुळं श्रीलंकेत वीज कपात करण्यात आलेली आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळं जनतेला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे.

श्रीलंकेत आर्थिक संकटासोबत राजकीय संकट देखील वाढलं आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान करण्यात आलं आहे. आता, राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here