Rajesh Tope | शिवसेना ही कायमच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी लावून धरत आली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्याने शिवसेनेला या मुद्दयावर फारशी आक्रमक भूमिका घेण्यात अडचण येत आहे. यावरून अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा नसल्याचे म्हटले आहे.

 

Rajesh Tope CM Uddhav Thackeray (1)
Rajesh Tope | औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हा आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावर नाही. आमच्या पक्षाच्या अजेंड्यावर तर तो विषय नाहीच नाही.

हायलाइट्स:

  • हे सगळे त्या त्या राजकीय पक्षांचे अजेंडे असतात
  • मला या सगळ्यावर वैयक्तिक मतही मांडायचे नाही
जालना: शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर असं, बोलायला आवडत असेल पण सध्या नामांतराचा विषय हा सरकारच्या अजेंड्यावर नाही, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. हे सगळे त्या त्या राजकीय पक्षांचे अजेंडे असतात. त्यामुळे मला या सगळ्यावर वैयक्तिक मतही मांडायचे नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. ते मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी विचारणा करण्यात आली. यावर राजेश टोपे यांनी अलीकडच्या काळातील वादांच्या अनुषंगाने म्हटले की, कोणी कुठे भेट द्यावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मला यावर कोणतीही टिप्पणी करायची नाही. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हा आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावर नाही. आमच्या पक्षाच्या अजेंड्यावर तर तो विषय नाहीच, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या सगळ्यावर शिवसेना (Shivsena) काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
औरंगाबादच्या जनतेला विचारा पाणी हवं की संभाजीनगर?, लोक तुमच्या डोक्यात हंडा घालतील, जलील यांची टीका
शिवसेना ही कायमच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी लावून धरत आली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्याने शिवसेनेला या मुद्दयावर फारशी आक्रमक भूमिका घेण्यात अडचण येत आहे. यावरून अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करु, असे सांगत होते. पण आता ते म्हणतात की औरंगाबादचे नाव बदलण्याची गरजच काय? कारण त्यांना माहिती आहे की, आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली साथ सोडतील आणि आपली सत्ता जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दाखवले. पण उद्धव ठाकरे यांना साधं एका शहराचं नावही बदलता येत नाही, अशी बोचरी टीकाही नवनीत राणा यांनी केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : changing aurangabad named as sambhajinagar is not maha vikas aghadi govt priority or agenda says rajesh tope
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here