ठाणे: गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. यामध्ये आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. तसेच तेथील पोलिसांशी संपर्क होता. याच दरम्यान करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या ४६ वरून अवघ्या २४ तासांमध्ये ७६ पर्यंत पोहचली आहे. सोमवारी दिवसभरात ३० नवे रुग्ण सापडल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीत ‘कोविड १९’ पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here