राज ठाकरेंना अयोध्या दौरा करायचा आहे. प्रभूरामाचं नाव घेऊन त्यांना महाराष्ट्राचा नेता व्हायचं आहे. आमची काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे काय, देशाचे नेते व्हा. मात्र अयोध्येत येण्याआधी माफी मागा, असं म्हणत सिंग यांनी मागणी लावून धरली. भाषा, जात, धर्माच्या आधारे देशात भेदभाव होणार नाही, असं आपल्या घटनेत लिहिलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
राज ठाकरेंना त्यांच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची संधी मिळत आहे. माझ्याकडून चूक झाली. अशी चूक यापुढे होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हणावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माफी मागावी. आदित्यनाथ आधी संत आहेत. मग ते मुख्यमंत्री आहेत. राज त्यांच्याकडे माफी मागू शकतात. साधूसंतांची माफी मागू शकतात, असं सिंह यांनी म्हटलं.
राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत येणार होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला. त्यांनी दौरा रद्द केलेला नाही, केवळ स्थगित केला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ते ५ जूनला आले असते, तरी आमची हरकत नव्हती. पण त्याआधी त्यांनी माफी मागायला हवी, असं सिंह म्हणाले.
राज ठाकरेंना उत्तर भारतात कुठेच पाय ठेवू देणार नाही; बृजभूषणची पुन्हा धमकी