सिंधुदुर्ग: शिवसेनेच्या पुढाकारानं राज्य सरकारनं गरिबांसाठी सुरू केलेल्या ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व भाजपचे आमदार आपल्या मतदारसंघात ” सुरू करणार आहेत. ही थाळी गरिबांना मोफत मिळणार आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होत आहे. त्यांना आधार म्हणून राज्यभरात अनेक लोक मदतीसाठी पुढं येत आहेत. नीतेश राणे यांनीही तसंच पाऊल उचललं आहे. नीतेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघात कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्यानं ‘कमळ थाळी’चा उपक्रम सुरू होत असून त्या अंतर्गत दररोज १५० लोकांना विनामूल्य भोजन दिलं जाणार आहे. ‘कमळ थाळी’मुळं गरिबांना नक्कीच मदत होईल, असा विश्वास नीतेश यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

‘कमळ थाळी’त काय मिळेल?

२ मूद भात
२ चपाती
१ वाटी वरण/डाळ (आमटी)
१ भाजी

वाचा:

कुठे मिळेल थाळी?

लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर (संजीवन हॉस्पिटलजवळ), कणकवली येथे दुपारी १२ ते २ या वेळेत ही थाळी मिळेल.

वाचा:

‘शिवभोजन’ला टक्कर

विधानसभा निवडणूक प्रचारात वचन दिल्यानुसार शिवसेनेनं राज्यात १० रुपयांत शिवभोजन द्यायला सुरू केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात ही योजना तालुका स्तरावरही राबवली जाणार आहे. असं असतानाही राणे यांनी कणकवलीमध्ये ‘कमळ थाळी’ सुरू केली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या योजनेला टक्कर देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या शिवभोजन थाळीनंतर भाजपनंही गरिबांसाठी ५ रुपयांत दीनदयाळ थाळी सुरू केली होती. त्यामुळं पक्षाची योजना असताना स्वतंत्र उपक्रम सुरू करण्याचं प्रयोजन काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.

वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here