पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर आज ( शनिवारी) कामशेत जवळ असणाऱ्या बोगद्यात एका बसचा टायर फुटला होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे बोगद्यापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

दर आठवड्याला फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र, एका बसचा टायर फुटल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

महत्त्वाची बातमी! …म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी क्रेनच्या सहायाने वाहने दूर करण्यात येत आहे. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर रस्ता रिकामा करून वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र, याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आज शनिवार असल्याने वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असतात. त्यातच अचानक बसचा टायर फुटल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.

औरंगाबादमध्ये भरदिवसा हत्येचा थरार, कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनीचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here