पुणे:उद्धव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का? हिंदुत्व किंवा मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी आजपर्यंत एकतरी भूमिका घेतली आहे का? दरवेळी उद्धव ठाकरे केवळ १९९३ च्या दंगलीची आठवण काढतात. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

यावेळी राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. भाजप आणि शिवसेनेची केंद्रात सत्ता होती तेव्हा औरंगाबादच्या नामांतरचा प्रश्न का सोडवला नाही? उद्या औरंगाबादचे नामांतर झाले तर कशावर बोलायचे, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडतो. त्यामुळे हा मुद्दा सतत पेटवत ठेवला जातो. संभाजीनगर, जालन्यात १०-१० दिवस पाणी येत नाही. पण त्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो की, त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

अयोध्या दौरा, औरंगजेब ते अफजलखानाची कबर, राज ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे १० मुद्दे
राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या

या भाषणावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे तीन मागण्या केल्या. देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि औरंगाबादचं नामांतर करा, या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण कराव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राजकारणासाठी हिंदू मुस्लीमांच्या विरोधात बोलण्यासाठी एमआयएमला मोठं केलं. आपण एक राक्षस वाढवतोय, हे लक्षात आलं नाही. एमआयएमचा खासदार निवडून आला. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा खासदार निवडून आला, अशी टीका राज ठाकरेंनी केली. औरंगजेब हा शरद पवार यांना सुफी संत वाटतो का? अफजलखान हा त्याचं राज्य वाढवायला आला होता असं म्हणतात. तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता, असे राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here