पुणे : पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनार पट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरु होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, अशी माहिती पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी दिली. त्यामुळे उन्हाळ्याने त्रस्त झाल्याने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आमच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात विसरु नका, महादेव जानकरांचं फडणवीसांचं उत्तर
नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात आणि कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. ताज्या हवामान संकेतांनुसार, पश्चिमेकडील वारे दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पट्ट्यात मजबूत आणि खोल झाले आहेत. उपग्रहांच्या प्रतिमेनुसार, केरळ किनारपट्टी आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ढगाळ वातावरण वाढले आहे.

एकाला वाचवताना तिघे बंधाऱ्यातील पाण्यात बुडाले, लग्नघरावर शोककळा
येत्या २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याच कालावधीत अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात नैऋत्य मान्सूनच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी पुढील परिस्थिती देखील अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी कमाला तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.४ अंश इतके नोंदवले गेले.

Arvind Sawant : मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, पण संभाजीराजेंनी नाकारला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here