सरकारी विभाग बुचकळ्यात
मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मेची मुदत संपण्यापूर्वीच ३० जून, २०२२पर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा आदेश दिल्याने संबंधित विभाग बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
Home Maharashtra मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मनाई – chief...
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मनाई – chief minister’s big decision; prohibits transfers of officers and employees in the state government service
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या ३० जूनपर्यंत राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना मनाई केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३० जून, २०२२पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.