धुळे : भरधाव ट्रक आणि टाटा ४०७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अकोला येथून शिरपूर येथे कापसाचे बियाणे वितरीत करून चोपडा येथे जाणाऱ्या एमएच ४३ एफ ०८४२ क्रमांकाच्या टाटा ४०७ वाहनाला शिरपूर तालुक्यातील तरडीजवळ चोपडाकडून शिरपूर च्या दिशेने येणाऱ्या आरजे ४० जीएफ ४८२२ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात चालक अब्दुल समीर शेख जमीर वय २० आणि अब्दुल फारुख गुलाम वय २१ या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

भ्रष्ट मंत्र्याला हाकलल्यानंतर पंजाब सरकारचं मोठं पाऊल, राजकारण्यांसह ४२४ जणांची सुरक्षा काढली
झालेला अपघात हा एवढा भीषण होता की, टाटा ४०७ वाहनाचा जागीच अक्षरशः चक्काचूर झाला. तर बियाणे रस्त्यावर विखुरले गेले अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत मदत कार्य करून मयत झालेल्या दोघांना वाहना बाहेर काढून शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

माध्यमांचे एका रांगेत कॅमेरे पाहून राज ठाकरे म्हणाले, ऑस्ट्रेलियाने अशीच फिल्डिंग लावली होती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here