मुंबई: देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे.

वाचा:

राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.

वाचा:

दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयात आज दोघांचा करोनामुळं मृत्यू झाला. त्यात एका ७३ वर्षीय वृद्धाचा तर ३४ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यापैकी वृद्धाला किडनीचा आजार होता. या घटनेमुळं पुण्यात करोनामुळं बळी गेलेल्यांची संख्या ४० झाली आहे. यापैकी तब्बल ३२ मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here