नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलच्या अधिकृत माहितीनुसार राजस्थान आणि गुजरात यांच्यातील आयपीएलच अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाख ४ हजार आणि ८५९ जण मैदानात उपस्थित होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटी आणि नेतेमंडळी देखील उपस्थित होते. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. पंतप्रधानांच्या सुरेक्षेची काळजी म्हणून मैदानात तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारीत २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावल्या आणि यामध्ये १३० धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरला या सामन्यात स्वतःचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही, पण तरी देखील तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. एकंदरीत पाहता गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने ४ षटकांमध्ये १७ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.