मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची १० मतं फुटतील, असा खळबळजनक दावा सहाव्या जागेवरील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केला आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी ४२ जागांची गरज आहे. यापैकी ३० ते ३२ मते भाजपकडे (BJP) आहेत. अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळवही आम्ही केली आहे, असे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी म्हटले. राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची मतं फुटणार असल्याचा दावा केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे आता दिसत आहे. (Rajyasabha Election 2022)
पंकजा मुंडेंची आणखी एक संधी हुकली, भाजपने राज्यसभेची नावं जाहीर करताच म्हणाल्या…
राज्यातील सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भाजपला मतदार करतील. भाजपकडे सध्या स्वत:ची ३० ते ३२ मतं आहेत. १,२, ३ अशा पद्धतीने मतदान होणार आहे. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपचा हातखंडा आहे. तिसरी जागा ही भाजपचीच होती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अतिरिक्त १० मतांची बेगमी केली आहे, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले.

शिवसेनेला शह!; फक्त १३ मते हवीत, राज्यसभेसाठी आता भाजपची मोर्चेबांधणी
धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपचा खास प्लॅन

भाजपने तिसऱ्या जागेसाठी रविवारी रात्री उशीरा धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले. मात्र, भाजपकडे फक्त २२ मतं आहेत. अपक्षांची मदत घेतली तरी भाजप फारतर ३२ जागांपर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळे भाजप ही जागा कशी निवडून आणणार, याचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक भाष्य केले आहे.आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवलाय, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here