Sanjay Raut | सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

 

Supriya Sule Sanjay Raut
सुप्रिया सुळे आणि संजय राऊत

हायलाइट्स:

  • राऊतांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदलाबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या
  • पुढची २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील
  • मुख्यमंत्रीपदावरून निर्माण करण्यात येणाऱ्या संभ्रमांकडे दुर्लक्ष करा
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून काहीजण संभ्रम निर्माण केले जात आहेत. पण पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. सध्या उद्धव ठाकरे हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्त्वावर खुश आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut talk with media in Mumbai)

यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदलाबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या. सध्या उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वत:ही पुढची २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून निर्माण करण्यात येणाऱ्या संभ्रमांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.
पद्मसिंह पाटलांची साथ विसरु शकत नाही, अजितदादांच्या सासुरवाडीत सुप्रिया सुळे भावूक
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यांवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
राष्ट्रवादीचे खासदार राज्यसभेत बोलतात, तेव्हा भाजपवालेही टाळ्या वाजवतात : सुप्रिया सुळे
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी ज्योतिषी नाही. याचा निर्णय जनताच घेईल. या प्रश्नाचे उत्तर जनता मतांच्या रुपातच देईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena sanjay raut hits back ncp supriya sule comment about cm post of uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here