नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनं २२ जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकाही मुस्लिम नेत्याचं नाव नाही. भाजपनं राज्यसभेवर पाठवलेल्या तीन मुस्लिम नेत्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. त्यात मुख्तार अब्बास नक्वी, सय्यद जफर इस्लाम आणि एम. जे. अकबर यांच्या नावांचा समावेश आहे. या तिन्ही खासदारांचा कार्यकाळ काही दिवसांत संपणार आहे. त्यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे भाजपनं आपला हिंदुत्वाचा हुकमी एक्का वापरल्याची चर्चा आहे.

लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. मात्र सदनात भाजपचा एकही मुस्लिम नेता नाही. आता त्याचीच पुनरावृत्ती राज्यसभेत होणार आहे. मुख्तार अब्बास नक्वी केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ ७ जुलैला संपत आहे. ६ महिन्यांत ते संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य म्हणून निवडून न आल्यास त्यांचं मंत्रिपद जाईल. सय्यद जफर इस्लाम पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांचा कार्यकाळ ४ जुलैला संपत आहे. तर एम. जे. अकबर यांचा कार्यकाळ २९ जूनला संपेल.
UP चा नेता राज्यावर लादला, कार्यकर्त्यांवर अन्याय, काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर २०२० मध्ये भाजपनं सय्यद जफर इस्लाम यांना पाठवलं होतं. भाजपचे प्रवक्त असलेल्या इस्लाम यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मुख्तार अब्बास नक्वी उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. समाजवाद पक्षाचे नेते आझम खान यांच्या राजीनाम्यानंतर रामपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नक्वी यांनी याआधी पूर्व रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. १९९८ मध्ये पहिल्यांदाच ते या मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले. वाजपेयी सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते.

दोन टर्म आमदारकी, कृषीमंत्रिपदी असतानाच पराभव, भाजपने तिकीट दिलेले अनिल बोंडे कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here