सांगली : सांगली, मिरज शहर परिसरात आणि जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस अखेर दाखल झाला आहे. सायंकाळच्या सुमारास दमदार असा पाऊस बरसला आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल होणार, असे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले होते. अखेर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. सांगली जिल्ह्याला येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला…

विजांच्या कडकडाटासह तुफान असा पाऊस सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये बरसला आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं. मात्र, आनंदाची बाब म्हणजे मान्सूनच्या पावसाचं आगमन वेळेत झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

लाईट बिल भरलं नाहीए? बिल अपडेटसाठी २० रुपये भरले अन् बँक खात्यातून ४६ हजार गेले
राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस येईल असे संकेत हवामान खात्याने वर्तवले होते. ते आता खरे ठरताना दिसत आहेत. याचदरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पुढील ३ ते ४ तासात अहमदनगर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी ४० किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

हनुमान चालीसासाठी मनसेने आयोजित केली स्पर्धा; अहमदनगरचा अंबिकानगर असा उल्लेख
तसेच विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पुढील काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील निर्जन ठिकाणी येण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ कोणीच बाहेर पडण्याची सूचना देण्यात आली आहे.

पूनम पांडेला न्यूड फोटोशूट करणं पडलं महागात, २ वर्ष जुन्या प्रकरणात आरोपपत्र दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here